दिवा येथील शिवसेनेच्या पाईपलाईन लोकार्पण सोहळ्याच्या निषेधार्थ दिवा भाजपने रेल्वे स्टेशन येथे निदर्शने करत लोकांना पाण्यासाठी रिकामे कॅन आणि बादलीचे वाटप केले. मुख्य जलवाहिनीच्या कामांमध्ये आणि शहरांसाठी आलेल्या 800 कोटींच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. दिवा शिवसेनेच्या नेत्यांची चौकशी व्हावी अशी मागणी भाजपने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्री नव्या पाईपलाईनच्या लोकार्पणासाठी दिव्यात येत असतानाच काल रात्री मुख्य पाईपलाईन लिकेज झाल्याने आणि गेले आठ दिवस दिव्यात तीव्र पाणी टंचाई असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने स्थानिक शिवसेना नेत्यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी दिवा स्टेशन येथे निदर्शने केली.