खासगी फायनान्स कंपनीविरोधात आठ दिवसांत कार्यालय बंद करण्याचे आदेश – अविनाश जाधव

खासगी फायनान्स कंपनीच्या वसुलीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंपनीचे ठाणे कार्यालय आठ दिवसांत बंद करण्याचा इशारा दिला आहे, अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा मनसेच्या सुमारे 100 कार्यकर्त्यांनी ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश यांच्या नेतृत्वात आयटी पार्क परिसरात आंदोलन करुन दिला. अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून घोषणाबाजी करत पोलिसांना निवेदन दिले. फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटने अपशब्द वापरले अशी तक्रार एका महिला कामगाराने जाधव यांच्याकडे केली होती. महिलेने कॉम्प्युटरसाठी फायनान्स घेतला होता, मात्र तीन ते चार महिन्याचे पैसे न दिल्याने हे कॉल आले होते. एजंट हिंदीत बोलत असून त्यांनी मराठीतच बोलावे असे अविनाश जाधव म्हणाले. त्यांनी फायनान्स कंपनीकडे तक्रार केली होती, त्यावरून रिकव्हरी एजन्सी काढून टाकण्यात आली होती. पण ते समाधानी नाहीत, कारण दुसर्‍या कंपनीकडून कॉल येऊ लागतील. त्यामुळे या फायनान्स कंपनीला ठाण्यातील व्यवसाय बंद करून कार्यालय हटवावे लागणार आहे. आठ दिवसांत हे काम पूर्ण न झाल्यास मनसे आपल्या पद्धतीने बंद पाडेल. आंदोलनादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त असल्याने मनसे कार्यकर्त्यांना आत जाता आले नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading