महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलीसांनी अटक केली आहे. होळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीमलंग गडावर झालेल्या आरती दरम्यान धक्काबुक्कीचा प्रकार घडला होता. या प्रकाराच्या निषेधार्थ श्री मलंग गडावर जात असताना पोलीसांनी अविनाश जाधव यांना रस्त्यातच अटक केली. अविनाश जाधव यांनी श्रीमलंग गडावर झालेल्या प्रकाराबाबत निषेध नोंदवण्यासाठी चलो मलंगगड अशी हाक दिली होती. या हाकेला प्रतिसाद मिळू नये म्हणून पोलीसांनी आता धरपकड सुरू केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिका-यांना त्या त्या विभागातील पोलीस ठाण्यांमधून स्थानबध्द केलं जात आहे. अविनाश जाधव यांनी चैत्र पौर्णिमेला पुन्हा चलो मलंगगड अशी हाक दिली आहे.