महापालिका क्षेत्रात लोकशाही पंधरवडा निमित्तानं लोकशाही बळकट करण्याचा निर्धार

महापालिका क्षेत्रात लोकशाही पंधरवडा कार्यक्रम सुरू झाला असून यानिमित्तानं लोकशाही बळकट करण्याचा निर्धार पालिका प्रशासन आणि पदाधिका-यांनी केला. राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून नागरिकांनी निवडणूक कार्यक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन महापौर आणि आयुक्तांनी यावेळी केलं. २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत लोकशाही पंधरवडा साजरा करण्यात येत असून यानिमित्तानं पालिका क्षेत्रात विविध प्रसारमाध्यमांद्वारे लोकशाही, निवडणूक आणि सुशासन याविषयी नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. येणा-या प्रत्येक निवडणुकीमध्ये नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून सहभागी व्हावे तसंच ज्या युवकांचे नाव मतदारयादीत समाविष्ट नाही त्यांनी तात्काळ आपले नाव नोंद करून लोकशाही बळकट करण्याच्या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी व्हावं असं आवाहनही यावेळी करण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading