निवृत्तीनंतर आत्मचरित्र लिहिण्याचा विचार – महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी निवृत्तीनंतर आत्मचरित्र लिहिण्याचा विचार बोलून दाखवला. ठाणे महापालिकेचं आयुक्तपद ५ वर्ष २ महिने सांभाळल्यानंतर आज एका पत्रकार परिषदेत त्यांनी हा विचार बोलून दाखवला. आपल्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये आपल्याला बहुतांश ठिकाणी पूर्णकाळ काम करता आलं. ठाण्यामध्ये तर मुदत संपल्यानंतरही काम करत होतो. ठाण्यामध्ये आपल्याला मोठा अनुभव मिळाला की ज्यावर एखादं पुस्तक लिहिण्याचा आपला निवृत्तीनंतर विचार असल्याचं संजीव जयस्वाल यांनी सांगितलं. आता नवीन नियुक्ती मिळेपर्यंत आयुक्त रजेवर जाणार असल्यामुळं आयुक्तांनी आज प्रसिध्दी माध्यमांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. एकप्रकारे पालिका आयुक्त निरोपाचंच भाषण करत होते. सर्वांना एकाच वेळी खूश करणं शक्य नाही. काहीजण नाराज झालेही असतील असं त्यांनी सांगितलं. आपण प्रशासनाची घडी बसवून उत्पन्न वाढीकडे लक्ष दिलं. २०० हून अधिक प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला. काही प्रकल्पांमध्ये अपयशही आलं. पण आपल्या डोळ्यापुढे सतत ठाण्याचाच विचार होता. ठाण्याशिवाय आपल्याला काहीही दिसत नव्हतं असंही पालिका आयुक्तांनी सांगितलं. आता आपण धरमशालेला जाऊन दलाई लामांची भेट घेणार असल्याचंही पालिका आयुक्तांनी सांगितलं. ठाणेकरांचं आपल्याला अपार आणि अलोट प्रेम लाभलं याबद्दल त्यांनी ठाणेकरांचे आभारही मानले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading