ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गटारं, कलवट, नाल्यांमधून टाकलेल्या विद्युत वाहिन्या काढण्याची मागणी एक जागरूक नागरिक राजीव दत्ता यांनी महापौरांकडे केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गटारं, कलवट, नाले यामधून विद्युत वाहिन्या गेल्या आहेत. या विद्युत वाहिन्यांमध्ये कचरा अडकतो आणि पावसाळ्यात पाणी साचतं. महापालिका साफसफाईसाठी लाखो रूपये खर्च करूनही परिस्थिती जैसे थे राहते. यामुळं स्वच्छता सेवकांच्या जीवालाही धोका निर्माण होतो. अनेकदा यामुळं स्वच्छता सेवक गटारं, नाले, कलवट योग्य पध्दतीनं स्वच्छ करत नाहीत म्हणून या विषयाची गंभीर दखल घेऊन महावितरणला महापालिका क्षेत्रातील कलवट, नाले, गटारांमधील विद्युत वाहिन्या काढून टाकण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी राजीव दत्ता यांनी महापौरांकडे केली आहे.