नालेसफाई ३१ मे पर्यंत योग्यत-हेने न झाल्यास कारवाईचा प्रशासनाचा इशारा

महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे ६५ ते ७० टक्के पुर्ण झाल्याचा दावा आयुक्त विपीन शर्मा यांनी काही दिवसांपुर्वी केला असतानाच, शहरात जेमतेम ४० ते ५० टक्केच नालेसफाईची कामे पुर्ण झाल्याची बाब पालिका अधिकारी आणि ठेकेदारांच्या बैठकीतून समोर आली आहे. कोणत्याही परिस्थितीत ३१ मेपर्यंत नालेसफाईची कामे पुर्ण झाली नाहीत तर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. दरवर्षी मे महीन्यात नालेसफाईची कामे सुरु केली जातात आणि पाऊस सुरु झाला तरी कामे पुर्ण होत नसल्यामुळे टिका होते. पण यंदा एप्रिल महिन्यांतच नालेसफाई सुरू करण्यात आली होती. नालेसफाईचा प्रत्येक ठेकेदाराकडून कामांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी काही ठेकेदारांनी ६० ते ७० टक्के तर काहींनी ९० टक्के नालेसफाईची कामे केल्याचा दावा केला. पण स्थानिक अधिकाऱ्यांनी मात्र नालेसफाई आवश्यक तितकी झाली नसल्याचं स्पष्ट केलं. नालेसफाई योग्य त-हेनं आणि ३१ मे पर्यंत न झाल्यास पालिका प्रशासनानं कारवाईचा इशारा दिला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading