नववर्षाच्या स्वागतासाठी एक दिवसाकरता रात्रीची संचारबंदी शिथील करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कोरोना नियंत्रणासाठी असलेल्या कडक निर्बंधांमुळे राज्यातील नवीन रूग्णांचा आलेख खालवलेला आहे. नागरिकही सर्वप्रकारच्या सुरक्षा उपाययोजनांचं पालन करण्यास सरावले आहेत. आत्तापर्यंत आलेले सर्व धार्मिक सण, उत्सव, सर्वधर्मीयांनी साधेपणाने साजरे केले आहेत. परंतु सध्याच्या संचारबंदीमुळे नववर्षाचं स्वागत उत्साहानं करता येणार नाही. जवळपास वर्षभर कोरोनाच्या तणावाखाली दैनंदिन जीवन व्यथित झालं आहे. यामुळं नववर्षाच्या स्वागतासाठी रात्रीची संचारबंदी एक दिवस शिथील करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.