केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित केली जाणारी राष्ट्रीय बालविज्ञान परिषद यंदा ऑनलाईन होणार आहे. या बालविज्ञान परिषदेचं यंदाचं हे २९वं वर्ष असून गेली २० वर्ष ठाण्यातील जिज्ञासा ट्रस्ट या बालविज्ञान परिषदेचे राज्य समन्वयक म्हणून काम करत आहे. शाश्वत जीवनासाठी सामाजिक नाविन्यपूर्णता असा मुख्य विषय आहे. जिल्ह्यातून बालविज्ञान परिषदेसाठी २६८ प्रकल्पांची नोंदणी झाली होती. यातील १०२ प्रकल्पांच्या सारांशाची निवड जिल्हा पातळीसाठी झाली आहे. या जिल्हा पातळीसाठी निवड झालेल्या बाल वैज्ञानिकांनी आपले प्रकल्प जिज्ञासा सायन्स ॲट जीमेल डॉट कॉम या मेलवर पाठवण्याचं आवाहन जिज्ञासानं केलं आहे. या प्रकल्पांचं परीक्षण तज्ञ व्यक्तींकडून केलं जाणार असून जानेवारीच्या तिस-या आठवड्यात होणा-या ऑनलाईन प्रकल्पात निवड झालेल्या या प्रकल्पांचा सामावेश केला जाणार आहे.