धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणीपुरवठा करणा-या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला भातसा आणि बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात ८२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. भातसा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ९४२ दशलक्ष घनमीटर असून या धरणामध्ये आजघडीला २८२ दशलक्ष घनमीटर म्हणजे ३१ टक्के पाण्याचा साठा आहे. बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ८० मिलीमीटर पाऊस झाला आहे. बारवी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता २३३ दशलक्ष घनमीटर आहे. आजघडीला या धरणात ६५ दशलक्ष घनमीटर म्हणजे २८ टक्के पाण्याचा साठा आहे. पाणी साठ्याची परिस्थिती सुधारत असली तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत आजघडीला भातसा धरणात ९७ दशलक्ष घनमीटरनं पाण्याचा साठा कमी आहे. तर बारवी धरणात गेल्यावर्षीच्या तुलनेत आजघडीला २५ दशलक्ष घनमीटरनं पाण्याचा साठा कमी आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading