दुकाने लावण्याच्या वादातुन ठाण्यात काल रात्री एकाची हत्या झाली असुन पोलिसांनी या प्रकरणी दोघा हल्लेखोरांना अटक केली आहे. पोलिस उपआयुक्त गणेश गावडे यांनी ही माहिती दिली. ठाण्याच्या जांभळी नाक्यावर राहणाऱ्या रविंद्र परदेशी यांच्यावर काल रात्री ते घरात जात असताना हल्ला झाला. त्यांच्यावर ध्रुव पटवा आणि अश्रफ अली या दोघांनी हल्ला केल्याचे निष्पन्न झाले होते. हल्ला झाल्यावर जखती अवस्तेतील रवींद्र परदेशी यांना ज्युपीटर रुग्णलयात दाखल करण्यात आले होते पण तर्त्पुवी त्यांचा मृत्यू झाला होता. परदेशी, पटवा आणि अश्रफ अली यांच्यात दुकान लावण्यावरून वाद होता. परदेशी हे पटवा आणि अश्रफ अली यांच्या समोर आपला व्यवसाय करत होते. त्यातून झालेल्या वादातून ही हत्त्या झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी पटवा आणि अश्रफ अलीला अटक केली असुन पुढील तपास सुरू असल्याचं उपआयुक्त गणेश गावडे यांनी सांगीतले.