ठाण्यामध्ये कायद्याची भिती न राहील्यानं ठाण्याचा बिहार झाल्याची टिका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. गुंडांना बंदूकिचे परवाने मिळत आहेत. येऊरच्या निर्सगरम्य जंगलात दारू आणि वेश्या व्यवसाय सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच ठाणं हे जपायला हवं पण हफ्त्यामुळे ते डबघाईला आलं आहे. अशानं ठाणे क्राईम कॅपीटल होईल मुख्यमंत्र्यांनी या कडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.