शालांत परीक्षेच्या आज जाहीर झालेल्या निकालात बारावी प्रमाणेच दहावीतही मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्याचा निकाल ९६.६१ टक्के लागला असून यामध्ये उत्तीर्ण होणा-यांच्यात मुलांची टक्केवारी ही ९५.६० टक्के तर मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९७.६७ टक्के आहे. शालांत परीक्षा ५५ हजार २८७ विद्यार्थ्यांनी दिली. त्यापैकी ५२ हजार ८५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ५२ हजार २५९ मुलींनी शालांत परीक्षा दिली त्यापैकी ५१ हजार ४३ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.