डोंबिवलीहून ठाण्यात आता अवघ्या २० मिनिटांत पोहचता येणार आहे. डोंबिवली मोठा गाव मानकोली पूल मे अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. कल्याण डोंबिवलीकरांना लवकरात लवकर ठाणे मुंबई गाठता यावे यासाठी एमएमआरडीएमार्फत उल्हास खाडीवर माणकोली ते मोठागाव दरम्यान पुलाचे बांधकाम सुरू आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नानंतर या पुलाच्या बांधकामाला वेग आला. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर डोंबिवली ते ठाणे या रस्त्याने प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होईल. या पुलाचे काम मे अखेर पूर्ण होईल आणि हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात येईल अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.