स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचा जागर ‘जयोस्तुते’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून ठाणेकरांसाठी आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष विनायक नलावडे आणि अलोक कडव यांनी शुक्रवारी सिनेअभिनेते शरद पोंक्षे हे ‘सावरकर विचारांचा जागर’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या सोहळ्यास मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील उपस्थित राहणार आहेत. आधुनिक हिंदुत्वाचे पुरस्कर्ते स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयावर शरद पोंक्षे बोलणार आहेत. स्वातंत्र्यानंतर सुमारे 50 वर्षांहून अधिक काळ काँग्रेसची गल्ली ते दिल्ली सत्ता होती. या काळात शक्य त्या मार्गाने स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु, स्वातंत्र्यवीर सावरकर हा सूर्य कधी मावळला नाही, तो कधी मावळणारही नाही; किंबहुना, तो आम्ही मावळू देणार नाही, असा निर्धार विनायक नलावडे यांनी व्यक्त केला.