ठाण्यात सध्या असह्य उन्हाळा होत असून आज ठाण्यात तब्बल ४२ अंशाच्या वर तापमानाची नोंद झाली. आज दुपारी दीडच्या सुमारास ४२.८ अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं तर किमान तापमान २५ अंश सेल्सियस इतकं नोंदवलं गेलं. ठाण्यात सध्या उष्णतेची लाट जाणवत असून अंगाची लाहीलाही होत आहे. यामुळे नागरिकांच्या तब्येतीवरही याचा परिणाम होत असून उन्हामुळे होणा-या विकारांमध्ये वाढ झाल्याचं दिसत आहे.