रायगडावरील माती घेऊन कारसेवक अयोध्येला रवाना झाले. अयोध्या येथील राम मंदिर उभारणीच्या पायाभरणीचा शुभारंभ 5 ऑगस्टला होणार असून त्यासाठी ठाण्यातील विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते रायगडावरील माती आणि गंगाजल घेऊन निघाले. आमदार संजय केळकर यांनी या कारसेवकांना मातीचा कलश देऊन शुभेच्छा दिल्या.