जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार ५९३ नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार ५९३ नवे रूग्ण सापडले. जिल्ह्यात सद्यस्थितीत २२ हजार ५२ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत २ हजार ३६५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६१ हजार रूग्ण ५३९ कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण ८५ हजार ९५६ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या ४ हजार ५९८ रूग्ण उपचार घेत असून १३ हजार ८३४ कोरोना रूग्ण बरे झाले तर ६३७ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये ५ हजार ७७० रूग्ण उपचार घेत असून १३ हजार ८४० बरे झाले तर ३५७ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ४ हजार ६०२ रूग्ण असून १० हजार ३६५ बरे झाले तर ४१८ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये १ हजार ६८८ रूग्ण उपचार घेत असून ६ हजार ३५२ कोरोनातून बरे झाले तर २७४ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये १ हजार ४०३ रूग्ण असून ५ हजार २६१ बरे झाले तर १३१ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये ४६६ रूग्ण उपचार घेत असून २ हजार ९५५ कोरोनातून बरे झाले तर १९७ जणं दगावले. अंबरनाथमध्ये ५८२ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ३ हजार ५७ बरे झाले तर १५१ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये ३४३ रूग्ण असून २ हजार १७५ कोरोनामुक्त झाले तर ४७ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये २ हजार ६०० रूग्ण असून ३ हजार ७०० बरे झाले तर १५३ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading