ठाण्यातील रेमंड कंपनीतील कार्यालयाला आज पहाटे साडेपाचच्या सुमारास भीषण आग लागली होती. ठाणे महापालिकेचं आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेऊन ही आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यासाठी अग्निशमन दलाचे ३ बंब, ३ पाण्याचे टँकर आणि २ मोठे पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल होते. ही आग नक्की कशाने लागली हे कळू शकले नाही. सुदैवाने यामध्ये कुठलीही हानी झाली नाही.