ठाण्यातील कन्या शाळेचा वीज पुरवठा कापण्यात आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांनी आज आंदोलन केलं. जिल्हा परिषदेकडून चालवण्यात येणा-या मुलींच्या कन्या शाळेचा वीज पुरवठा वर्षभर वीज बिलाची रक्कम न भरल्यामुळे खंडीत करण्यात आला आहे. गेले चार महिने या शाळेत वीज नसून येथील ३६ विद्यार्थई अंधारात शिक्षण घेत आहेत. या विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्यात आले आणि राहिलेले पैसे भरून पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. या शाळेत घरची गरीबी असलेली मुले शिक्षण घेतात. गेल्या चार महिन्यांपासून शाळेत वीज नसल्याने अंधारातच मुलांना शैक्षणिक धडे गिरवावे लागत आहेत.