ठाणे रेल्वे पोलीसांनी एका महिलेला अडीच लाखांचे दागिने असलेली बॅग पुन्हा मिळवून दिली आहे. काल दुपारच्या सुमारास अरूणकुमार आणि विक्रमजीत हे दोन पोलीस ठाणे रेल्वे स्थानकातील फलाटांवर गस्त घालत होते. ही गस्त घालत असताना त्यांना एक निळ्या रंगाची पिशवी सापडली. ही पिशवी आणून त्यांनी पोलीस ठाण्यात उघडली असता त्या पिशवीमध्ये डबा, कपडे, साडेआठ हजार रूपयांची रोकड आणि मंगळसूत्र, नेकलेस, २ सोन्याच्या बांगड्या, २ कानातली,२ रिंग, ४ पेंडण्ट असे ९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने होते. नेरूळमध्ये राहणारे दत्तप्रसाद देसाई आणि त्यांच्या पत्नी संचिता देसाई हे दोघं नेरूळला जाण्यासाठी फलाट क्रमांक ८ वर गाडीची वाट पाहत होते. घाईघाईत ते पिशवी विसरून गेले. पण पोलीसांच्या दक्षतेमुळं दागिन्यांची पिशवी त्यांना पुन्हा परत मिळाली. देसाई दाम्पत्यानं पोलीसांच्या या कामगिरीबद्दल कौतुक केलं आहे.