बिहार आणि नेपाळमधून आणलेल्या १७ बाल कामगारांची सुटका

कामासाठी बिहार आणि नेपाळहून आणलेल्या बाल कामगारांची आज सुटका करण्यात आली. प्रथम संस्था, सलाम बालक आणि रेल्वे पोलीसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत या मुलांची सुटका करण्यात आली. ठाणे रेल्वे स्थानकात एका ट्रेनमधून आणलेल्या या १७ मुलांची सुटका करण्यात आली. ही मुलं बिहार आणि नेपाळहून वेगवेगळ्या ठिकाणासाठी कामकरिता आणण्यात आल्याचं सांगितलं जातं. या मुलांना नागपाड्यातील चामड्याच्या उद्योगांमध्ये काम करण्यासाठी आणण्यात आलं होतं. आता या मुलांची रवानगी उल्हासनगरच्या बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading