ठाणे महापालिका मुख्यालयासमोरच सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले.
संचारबंदीच्या काळात लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी पालिकेतर्फे अनेक ठिकाणी छोटी छोटी भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यात आली आहेत. पालिका मुख्यालयासमोरच असं एक भाजीपाला विक्री केंद्र असून त्याठिकाणी ठाणेकरांनी चक्का सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पायदळी तुडवल्याचे चित्र दिसून आले. पालिकेकडून प्रत्येक ठिकाणी सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी मार्कींग करून देण्यात आलं आहे. परंतु हे नियम मोडत नागरिकांनी भाजी खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून भाजी खरेदी करताना नागरिक कुठल्याही प्रकारची काळजी घेत नसल्यानं चिंता व्यक्त होत आहे. नागरिकांनी नियम धाब्यावर बसवून अशीच गर्दी केली तर संचारबंदीत वाढ केल्याशिवाय प्रशासनापुढे दुसरा पर्यायच नाही हे नक्की.