ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्या वतीनं ठाण्यात प्रथमच पर्यावरण पूरक अशा सामुहिक अग्निहोत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. सामुहिक अग्निहोत्र हा पर्यावरणासाठी पूरक असा होम असून तो अक्कलकोट शिवपूरी येथील गजानन महाराजांनी सुरू केलेला आहे. सूर्यास्त आणि सूर्योदय अशा दोनच वेळी अग्निहोत्र करायचं असतं. घरात अग्निहोत्र केल्यास त्यापासून सकारात्मक उर्जा निर्माण होते. शिवपुरी येथील डॉक्टर —, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह या सामुहिक अग्निहोत्रात अनेक मान्यवर सहभागी झाले होते. आयुर्वेदानुसार अग्निहोत्रामुळे अनेक व्याधींवर उतार मिळतो. वायुमंडल शुध्दीसाठी अग्निहोत्राचा प्रसार व्हावा या उद्देशानं या सामुहिक अग्निहोत्राचं आयोजन करण्यात आल्याचं आयोजक सिताराम राणे यांनी सांगितलं.