शहरातील जैव विविधतेचा ठेवा जतन करावा तसंच त्यांचे चांगल्या प्रकारे संवर्धन करण्यासाठी आवश्यक त्या शास्त्रोक्त पध्दतीने उपाययोजना करण्याकरिता महापालिकेनं पुढाकार घेण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. राज्य वन संरक्षण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत प्रामुख्यानं शहरात असलेल्या जैव विविधतेची माहिती घेणं, त्या माहितीची व्यवस्थित मांडणी करणं आणि त्यानंतर त्यांचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी एक कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या. जैव विविधतेचे संवर्धन करण्यासाठी सर्व तज्ञांना कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करता येऊ शकतात याचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले. हा अहवाल प्राप्त होताच त्यानंतरची कार्यवाही करता येईल असं पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं.