जबरी सोनसाखळी चोरी करणाऱ्या चौघा सराईत आरोपींना जेरबंद करण्यात कल्याण गुन्हे शाखेला यश आलं आहे. कल्याण परिसरात सोनसाखळी चोरांना आवर घालण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकातील पोलिस हवलदार प्रशांत वानखेडे यांना सोनसाखळी चोरी करणाऱ्या काही व्यक्ती टिटवाळा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानूसार पोलिसांनी सापळा लावुन सलमान ईराणी, हसन सैयद, सावर ईराणी, मस्तान अली ईराणी अशा चौघांना ताब्यात घेतलं. त्यांच्या चौकशीत ६ गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली आहे. या चौघांकडून ७ तोळे सोन्याचे दागीने मोबाईल फोन असा एकुण ५ लाख १५ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.