सध्या सर्वत्र नामकरणाचं पेव फुटल आहे. कचराळी तलावाच्या नामकरणावरून वाद निर्माण झाले असतानाचं आता घोडबंदर रस्त्याचे नामकरण करावे अशी मागणी पुढे आले आहे. ठाण्यातील महत्वाच्या अशा घोडबंदर रस्त्याचे नाव बदलून वीर चिमाजी आप्पा मार्ग करावे अशी मागणी प्रसिध्द अभिनेते मुकेश खन्ना यांनी पालीका आयुक्तांकडे केली आहे.
सांस्कृतिक वासरा लाभलेल्या ठाणे शहराला अनेक वर्षांचा पुरातन काळाचा इतिहास आहे. याच ठाणे शहरात इंग्रजांच्या, ब्रिटिशांच्या तसेच पूर्तुगीजांच्या अनेक वास्तू आजही अस्तित्वात आहेत. तर काहींचे अवशेष आज ही पाहायला मिळत आहेत. अशातच वीर चीमाजी आप्पा यांनी देखील सतराशेच्या काळात अनेक लढाया जिंकून ठाण्यातील अनेक गड किल्ले पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडवून घेतले होते. त्यांचाचं पराक्रम सर्वांनाच लक्षात राहावा या उद्देशाने ठाण्यातील घोडबंदरचे नाव बदलून वीर चिमाजी आप्पा मार्ग असे करण्यात यावे तसेच फाउंटन येथे वीर चिमाजी. चौक उभारावा अशी मागणी शक्तिमान फेम अभिनेता मुकेश खन्ना यांनी संग्राम फाउंडेशन च्या वतीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे एका निवेदना द्वारे केली आहे.