गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपली कन्या नताशाचा विवाह अगदी साधेपणानं केला. सर्वसाधारणपणे जितेंद्र आव्हाड यांचा कोणताही कार्यक्रम हा दणक्यात असतो. मात्र स्वत:च्या मुलीचं लग्न अगदी साधेपणानं करून त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. विशेष विवाह कायद्यानुसार त्यांनी आपल्या मुलीचं लग्न नोंदणी पध्दतीनं केलं. लग्नापूर्वी सर्व धार्मिक विधी करण्यात आले. मात्र लग्न म्हटलं की बँडबाजा, गाजावाजा, नेत्रदीपक सोहळा पहायला मिळतो. त्यातच एखाद्या नेत्याच्या घरचा सोहळा असेल तर आणखी भर असते. पण गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या सर्व शाही पध्दतीला फाटा देत साधेपणानं लग्न करून लोकप्रतिनिधींसमोर आदर्श निर्माण केला आहे. लग्नानंतर नताशाला निरोप देताना जितेंद्र आव्हाड भावूक झाल्याचं दिसलं.