केंद्राकडून निधी मिळत नसल्याच्या तक्रारी करणा-या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी सरकारची ही रोजचीच ओरड असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका

केंद्राकडून निधी मिळत नसल्याच्या तक्रारी करणा-या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी सरकारची ही रोजचीच ओरड असल्याची शेलकी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल ठाण्यात बोलताना केली. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी आयोजित केलेल्या सहस्रचंडी नवकुंडीय महायज्ञाच्या दर्शनासाठी फडणवीस काल ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ही टीका केली. कोरोना काळात काम करणा-या राज्यातील कार्यकर्त्यांचं कौतुक करून हे वर्ष कोरोनाचा शेवट ठरो अशी प्रार्थना करत त्यांनी देवीला साकडे घातले. यावेळी कोरोना काळात काम करून आपलं कर्तव्य बजावणा-या ठाण्यातील ९ महिलांचा नवदुर्गा पुरस्कार देऊन त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कोपरीतील अटलबिहारी वाजपेयी एंजल्स पॅरेडाईज या कमानीचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावेळी झालं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading