कुपनलिका खोदताना मुंबई महापालिकेच्या बोगद्याला पडलेलं भगदाड त्वरित दूरूस्त कराव अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. मुंबईचे रोज १० लक्ष लिटर पाणी वाया जाते ते कोणाला कळू नये म्हणुन पंप लावून नाल्यात पाणी सोडण्यात आले आहे. हा बोगदा बंद करायचा असेल तर १५ दिवस शट डाऊन करावा लागेल मुंबईत १५ दिवस पाणी बंद करावे लागेल अस आव्हाड यांनी सांगीतलं. वागळे इस्टेट रोड नंबर १६ वर ठाण्यातील एका जबाबदार माणसाने बोरींग मारले आणि त्याला बोगदा पडला हे मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात आहे. त्यामुळे पाणी गढूळ येत आहे. हा बोगदा दूरूस्त करा आणि पाणी वाचवा शुद्ध पाणी द्या अशी मागणी आव्हाड यांनी केली. हजारो कोटींचा हा बोगदा आहे – अज्ञान असल्याने हे चुकीचे काम झालय पण यांत राजकारण आणू नका आणि मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळवू नका. गेल्या ५ महिन्यात यातुन दीट कोटी लीटर पाणी वाया गेल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. यातून पुढे मोठा धोका निर्माण होवू शकतो. हा खड्डा तात्काळ बुजवा याआधी देखील वागळे इस्टेट मधील मुंबई महापालिकेची पाईपलाईन फुटली होती आणि सर्वत्र पाणीचं पाणी होऊन लोकांचा जीव धोक्यात आला होता. अशी आठवणही जितेंद्र आव्हाड यांनी करून दिली.