कार्तिकी एकादशी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळानं १३०० जादा बसेस सोडल्या आहेत. पंढरपूर येथे ८ नोव्हेंबर रोजी होणा-या कार्तिकी यात्रेसाठी विविध बस स्थानकावरून या गाड्या सोडल्या जाणार आहेत. या यात्रेला जाण्यासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई आणि पुणे या पाचही विभागातून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. ठाण्यातून ३० विशेष जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. भाविकांनी या जादा गाड्यांचा लाभ घ्यावा असं आवाहन राज्य परिवहन महामंडळातर्फे करण्यात आलं आहे.