ऑईलने भरलेला टँकर ३ चारचाकी वाहनांवर आदळल्यानं झालेल्या अपघातात ३ जण जखमी

ऑईलने भरलेला टँकर ३ चारचाकी वाहनांवर आदळल्यानं झालेल्या अपघातात ३ जण जखमी झाले आहेत. काल रात्री सव्वा दहाच्या सुमारास हा अपघात घडला. हा टँकर ठाण्याच्या दिशेने येत असताना गायमुखजवळ चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. या अपघातामध्ये ३ जण एका गाडीत अडकले होते. आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलानं धाव घेऊन गाडीत अडकलेल्या तिघांची सुटका केली. हे तिघे गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना मीरा भाईंदर येथील भक्ती वेदांत हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं. या अपघातामध्ये विनोद खरात विनोद खरात, सृष्टी पाटील आणि पांडुरंग पाटील जखमी झाले तर या अपघातामध्ये सुझुकी ईर्टीगा, सुझुकी बलेनो आणि हुंदाई आयटेन या तीन वाहनांचं नुकसान झालं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading