वाशी येथील एपीएमसी मार्केटमधील धान्य बाजार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळे आजपासून पुन्हा सुरू झाला आहे. पालकमंत्र्यांनी संबंधितांची बैठक घेऊन अडचणी आणि व्यापाऱ्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या आणि त्या जागीच दूर केल्या. धान्य बाजारपेठेत बाहेरच्या कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. किरकोळ व्यापाऱ्यांनी आपली मागणी आगाऊ नोंदवावी, त्यानुसार त्यांचा माल थेट टेम्पोत चढवण्यात येईल, त्यांनी तो घेऊन जावा, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या कोरोना तपासणीची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी नवी मुंबई महापालिकेला दिले.