ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या सकाळी ९ वाजल्यापासून पुढील २४ तास बंद राहणार आहे. पाणी पुरवठ्याच्या नियोजनासाठी हा पाणी पुरवठा उद्या म्हणजे १९ जून सकाळी ९ पासून २० जून सकाळी ९ पर्यंत बंद राहणार आहे. यामुळं घोडबंदर रस्ता, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, गांधीनगर, इंदिरानगर, श्रीनगर, लोकमान्यनगर, समतानगर, ऋतूपार्क, सिध्देश्वर, साकेत, जेल, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर आणि कळव्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.