ठाण्यात होणारी उद्याची पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. उद्या नेहमीप्रमाणे पाणी पुरवठा होणार आहे. धरणातील पाणी साठा १५ जुलैपर्यंत पुरवण्यासाठी पाटबंधारे विभागातर्फे पाणी कपात लागू करण्यात आली आहे. यामुळं दर बुधवारी आणि शुक्रवारी शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा २४ तास बंद ठेवला जातो. मात्र उद्या पाणी कपात होणार नसून उद्या नेहमीप्रमाणे पाणी पुरवठा होणार आहे.