इंडियन ऑनलाईन कॅरम चॅलेंज स्पर्धेसाठी राज्यातून ठाण्याच्या चैताली सुवारेची निवड झाली आहे. इंडियन ऑनलाईन कॅरम स्पर्धेसाठी राज्यातून ४ जणांची निवड झाली आहे. सध्या चैताली ही बारावीची विद्यार्थिनी असून जिद्द, चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर तिने अनेक कॅरम स्पर्धेत पदकं मिळवली आहेत. आठवीत असताना तिने आयएस टुर्नामेंटमध्ये पहिला नंबर मिळवला होता. शालेय स्पर्धेतही तिने यश संपादन केलं आहे. चैताली ही डोंबिवलीची रहिवासी असून मूळची रत्नागिरीतील लांज्याची आहे. कालपासून या स्पर्धांना सुरूवात झाली असून ती या स्पर्धेत राज्याचं नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेत विभाग २ मध्ये भारतातून एकूण निवड झालेले ४८ खेळाडू आहेत. ही स्पर्धा चार लीगमध्ये खेळवली जाणार असून यातून निवडला जाणारा खेळाडू कॅरमचा चॅम्पियन बनणार आहे.