ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ३५९ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४ हजार ८ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत ५ हजार ९६६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख ३३ हजार ५६३ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण २ लाख ४३ हजार ५३७ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या ९७३ रूग्ण उपचार घेत असून ५३ हजार ३२३ कोरोना रूग्ण बरे झाले तर १ हजार ३१० जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये ९९३ रूग्ण उपचार घेत असून ५५ हजार ४६८ बरे झाले तर १ हजार १०४ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ९१० रूग्ण असून ४९ हजार १३८ बरे झाले तर १ हजार ५१ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये ३५१ रूग्ण उपचार घेत असून २४ हजार २७९ कोरोनातून बरे झाले तर ७८३ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये २४३ रूग्ण असून १० हजार ७५० बरे झाले तर ३६१ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये ३४ रूग्ण उपचार घेत असून ६ हजार २२१ कोरोनातून बरे झाले तर ३५२ जणं दगावले. अंबरनाथमध्ये ८८ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ७ हजार ८६४ बरे झाले तर ३०३ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये १६५ रूग्ण असून ८ हजार ६०५ कोरोनामुक्त झाले तर ११९ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये २५१ रूग्ण असून १७ हजार ९४४ बरे झाले तर ५८१ जणांचा मृत्यू झाला आहे.