आमदार जितेंद्र आवड यांनी ठाण्यातील कोर्ट नाका परिसरात असणाऱ्या डॅा. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली निदर्शने करत निषेध

जयपुर मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस मध्ये झालेला गोळीबार धार्मिक आणि जातीय विद्वेशातून झाल्याचा आरोप करत आमदार जितेंद्र आवड यांनी ठाण्यातील कोर्ट नाका परिसरात असणाऱ्या डॅा. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली निदर्शने करत निषेध नोंदवला. जितेंद्र आव्हाड यांच्या म्हणण्यानुसार एक क्लिप वायरल झाली असून त्यामध्ये मारेकरी आर.पी.एफ चा जवान हा या देशात राहायचे असेल तर मोदी आणि योगी म्हणावे लागेल असे म्हणतांना दिसत आहे. हे या देशातील जहाल आणि धार्मिक आणि व्देष पसरवणारी मानसिकता किती रुजली आहे हे दाखवत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. हे देशाला अत्यंत धोकादायक आहे हे वेळीच थांबायला हवे.अन्यथा हा देश उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आम्ही याचा निषेध करून हे मुक आंदोलन करत आहे अस आव्हाड यांनी यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading