येऊर येथील आदिवासींच्या जमिनी बळकाव प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन महसूल मंत्री यांनी दिले
आहे. येऊर येथील आदिवासींच्या जमिनी धाक दडपशाही करून बळकावल्या गेल्या आहेत. त्या बाबत तेथील जमिनीचे मालक असणाऱ्या आदिवासींनी तक्रार करूनही दखल घेतली जात नाही तथापि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार काय असा प्रश्न आमदार संजय केळकर यांनी आज प्रश्नोत्तरे चे वेळी विधानसभेत उपस्थित केला. त्यावर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले