अनधिकृत मजार तोडा नाही तर राम मंदिर बांधण्याचा ईशारा कल्याण मधील मनसेन दिला आहे. राज ठाकरेंच्या दादरच्या शिवाजी पार्क येथील भाषणानंतर कल्याण मधील मनसे सैनिक आक्रमक झाले आहेत. कल्याण मध्ये अशोक शिंदे यांची कल्याण लालचौकी परिसरात जागा आहे. मात्र या जागेवर गेल्या काही दिवसांपूर्वी अनधिकृत मजार बांधण्यात आली असून जागा मालकाकडून अनेक वेळा पालिका प्रशासन पोलीस प्रशासन आणि इतर शासकीय यंत्रणेकडे मागणी केली आहे. मात्र अद्याप कुठलीच कारवाई होत नसल्याने अखेर हे पाडण्यासाठी मनसेने पुढाकार घेतला आहे. या मजारीवर आठ दिवसांच्या आत कारवाई करावी अन्यथा मजारीच्या बाजूला उरलेल्या जागेवर राम मंदिर बांधण्याचा इशारा मनसेन दिला आहे. या प्रकरणामुळे कल्याण शहरातील वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.