केंद्र आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनांना गतिमान करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ कालावधीत महाआवास अभियान राबविण्यात आले.
Zilla Parishad
जिल्ह्यातील आरोग्य सुविधांना प्राधान्य देणारा जिल्हा परिषदेचा ९६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांबरोबरच जिल्ह्यातील आरोग्य सुविधांना प्राधान्य देणारा जिल्हा परिषदेचा ९६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज मांडण्यात आला.
जिल्ह्यात महाजीविका अभियानाचा शुभारंभ
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून जिल्हा कक्षातर्गत ‘महाजीविका अभियाना’ चा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनी आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा सेविका पुरस्काराने सन्मानित
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या वतीने पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा सेविका आदी २९ अधिकारी-कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील दोन महिला खेळाडूंना आदर्श पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
वेंगुर्ल्याच्या धर्तीवर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सांडपाणी, घनकच-याचा प्रश्न मार्गी लावणार
सिंधुदूर्ग जिल्हातील वेंगुर्ला नगरपरिषदेने सांडपाणी-घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत राबविलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम ठाणे जिल्हाच्या ग्रामीण भागात राबवून येथील सांडपाणी घनकचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील यांनी दिली.
आयकॉनिक सप्ताहामध्ये स्वच्छतेसह, जल जीवन मिशनच्या कामांची प्रभावी अंमलबजावणी
स्वच्छ भारत अभियान टप्पा-२ आणि जल जीवन मिशन या दोन्ही केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानांची प्रभावी अंमलबजावणी जिल्हाच्या ग्रामीण भागात सुरू आहे. या अभियानाची गती वाढविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ जानेवारी पासून आयकॉनिक सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
गावे स्वच्छ, सुंदर करण्यासह घराघरांत नळजोडणी होणार
प्रत्येकाला पिण्यायोग्य मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याबरोबरच गावात सांडपाणी घनकचऱ्याचे व्यवस्थापन करून गावं स्वच्छ-सुंदर बनविण्यावर जिल्हा परिषद भर देणार आहे.
गृह अलगीकरणात असणाऱ्या रुग्णांना जिल्हा परिषदेमार्फत मिळणार औषधाचे किट
कोविडमुळे गृह अलगीकरणात असणाऱ्या ग्रामीण भागातील रुग्णांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत औषध किटचे वाटप करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील १०० गावांमध्ये रथाच्या माध्यमातून स्वच्छते विषयक जनजागृती
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील १०० गावांमध्ये स्वच्छते विषयक कामांची जनजागृती करणारा रथ फिरणार आहे.
जिल्हा परिषदेतर्फे उमंग अभियान
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पहिले ते तिसरीच्या विद्यार्थ्यांची भाषा आणि संख्याज्ञान आकलन वृद्धीसाठी जिल्हा परिषदेने उमंग अभियान हाती घेतले आहे.