देशाच्या विभाजनानंतर भारतात पश्चिम पाकिस्तानात आलेले दोघे पंतप्रधान आणि एक उपपंतप्रधान बनला. मात्र देशाचं दुर्भाग्य असं की ३७० कलमामुळे पाकिस्तानामधून जम्मू काश्मीरमध्ये आलेल्यांना निवडणूक लढवता आली नाही किंवा त्यांना मतदानही करता आलं नाही. मात्र आता हे कलमच रद्द झाल्यानं सर्वांचा मार्ग खुला झाला आहे असं प्रतिपादन जे. पी. नड्डा यांनी केलं.