कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून इस्पितळात बेड उपलब्ध होत नाहीत, त्यातून रूग्णालयात प्रवेश मिळाला तरी ऑक्सीजनची कमतरता आणि रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी मारामार यामुळे ठाणे शहरातील करोनाबाधित रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक एकीकडे प्रचंड हतबल झाले असताना दुसरीकडे ठाणे महापालिकेची ढिसाळ यंत्रणा आणि निष्क्रिय प्रशासनाचे वाभाढे निघत असल्याचे दुर्दैवी चित्र समोर आले आहे.