जिल्ह्यामध्ये सोमवारी होणा-या मतदानात ६२ लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार

जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघासाठी येत्या सोमवारी मतदान होणार असून या मतदानात जिल्ह्यातील ६२ लाख २५ हजार १९४ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आज एका पत्रकार परिषदेत जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी ही माहिती दिली. या ६२ लाख २५ हजार १९४ मतदारांमध्ये ३१ लाख १९ हजार ८५० पुरूष, ३१ लाख ४ हजार ८९८ महिला तर ४४६ तृतीयपंथी मतदार आहेत. या मतदारांसाठी जिल्ह्यामध्ये एकूण ६ हजार ७१५ मतदान केंद्रं निर्माण करण्यात आली आहेत. यामध्ये शहरी भागात ५ हजार ५७९ तर १ हजार १३६ ग्रामीण भागात आहेत. मतदान कर्मचा-यांना आवश्यक असलेले साहित्य म्हणजे इव्हीएम, व्हीव्हीपॅट, लिफाफे, शाई असं आवश्यक साहित्य पुरवण्यात आलं आहे. जिल्ह्यामध्ये ६ हजार ६३५ दिव्यांग मतदार असून या मतदारांसाठी व्हीलचेअर, डोली तसंच मतदान केंद्रांपर्यंत पोहचण्यासाठी रिक्षा आणि विशेष मार्गांवर लो-फ्लोअर बसेस पुरवण्यात आल्या असल्याचं जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading