सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचं जिल्हाधिका-यांचं आवाहन

जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्याच्या दृष्टीनं सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केलं आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्याकरिता गर्दी कमी करणे हा प्रभावी उपाय असून त्यासाठी आवश्यक असेल तरच प्रवास करावा, खाजगी कंपन्यांमार्फत कर्मचा-यांना वर्क फ्रॉम होम संकल्पनेनुसार परवानगी देण्यात येत आहे. नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी मिशन मोडवर काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. विवाह समारंभ नियोजित असल्यास मोठा समारंभ टाळून गर्दी टाळावी, कोरोना संसर्गाबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रत्येकानं आपल्या स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिका-यांनी केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading