सरकारकडून गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि शांततेच्या तत्वांना हरताळ फासला जात असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचं मूक धरणं आंदोलन

भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि शांततेच्या तत्वांना हरताळ फासला जात असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसनं मूक धरणं आंदोलन केलं. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला सुरूवात केली. या कार्यकर्त्यांनी तोंडाला काळ्या फीती लावल्या होत्या. तसंच राफेल करारामध्ये झालेला भ्रष्टाचार, एचएएल कंपनीला राफेल बनवण्याची क्षमता नाही या असत्याची मांडणी, देशातील संविधानाचे दहन करणा-यांना अभय देऊन अशांती निर्माण करणे आदींच्या माध्यमातून महात्मा गांधींच्या सत्य, अहिंसा आणि शांतता या तत्वांना हरताळ फासला जात आहे अशा आशयाचे फलक आंदोलनाच्या ठिकाणी लावण्यात आले होते. शेतकरी, कामगार, दलित आदिवासी, मुस्लिम, धनगर आदींच्या विरोधात मोहिम राबवली जात असल्याचा आरोप करून गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता प्रणित सरकारचा निषेध करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading