रेल्वे बोर्डाच्या मुंबई विभागीय सल्लागार समितीच्या सदस्य पदी ठाण्यातील पत्रकार अमोल कदम यांची नियुक्ती झाली आहे. त्यांचा रेल्वे संदर्भात अभ्यास असून त्यांनी रेल्वे समस्या, प्रवाशांना भेडसावणारे प्रश्न आणि त्यातून तोडगा सुचवणारी अनेक वृत्तं प्रसिध्द केली आहेत. प्रवाशांचे प्रश्न मार्गी लावण्यास तत्पर असलेल्या कदम यांच्या कार्याची दखल घेऊन रेल्वे बोर्डानं त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.