राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम हे व्यक्ती निर्माणाचे आहे आणि संघाचे सूत्र म्हणजे व्यक्ती निर्माण से समाज परिवर्तन की ओर असे असून कठीण समय येऊ नये म्हणून संघाचे काम सुरू आहे. समाजाला सोबत घेऊन संघ स्वयंसेवक छोटे-छोटे प्रयोग, कुटुंब प्रबोधन, ग्रामविकास आणि सागरी सीमा मंच ह्यानावे तीनशेहून अधिक गावांमध्ये छोटे प्रयोग सुरू असल्याची माहिती यावेळी संस्कार भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री अभिजित गोखले यांनी यावेळी दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्गाचा जाहीर समापन कार्यक्रम न्यू होरायझन हायस्कूलमध्ये झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कोकण प्रांताचा प्रथम वर्ष संघशिक्षा वर्ग सरस्वती हायस्कूल, कावेसर, घोडबंदर येथे ८ मे पासून झाला. या वर्गात प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा राज्यातून शिक्षार्थी आलेले होते. वर्गात व्यावसायिक, शिक्षक, प्राध्यापक, शेतकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षार्थी म्हणून प्रशिक्षण घेतले. आदित्य बिर्ला समुहाचे संयुक्त अध्यक्ष अपूर्व गुप्ता यावेळी म्हणाले की, या कार्यक्रमातील उपस्थिती माझ्यासाठी आशीर्वादा सारखे आहे. संघाचे ‘उत्तिष्ठ भारत’ हे उद्दिष्ट साध्य होत असल्याचे दिसते. येथे उपस्थित शिक्षार्थी परिष्कृत भारत निर्मितीसाठी योगदान देतील अशी खात्री आहे. अभिजित गोखले यावेळी म्हणाले की, संघाचे काम हे व्यक्ती निर्माणाचे आहे. संघ म्हणजे प्रामाणिकता, निस्वार्थता, देशभक्ती, सेवा हे आहे हे सिद्ध झाले आहे. लोक म्हणतात ‘कठीण समय येता संघ कामास येतो’. कोरोना काळात संघासह समाजातील अनेकांनी काम केले. हे आता केवळ देशातच नाही तर साऱ्या जगात अनुभवास यायला लागले आहे. यापुढे कठीण समय येऊ नये म्हणून संघाचे काम सुरू आहे. समाजाला सोबत घेऊन संघ स्वयंसेवक छोटे-छोटे प्रयोग, उपक्रम करीत आहेत. यात कुटुंब प्रबोधन अंतर्गत कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी कुटुंबातील संवाद पुनःस्थापित झाला पाहिजे यासाठी काम सुरु आहे. तसेच ग्रामविकासाचे अनेक छोटे प्रयोग सुरू आहेत. सागरी सीमा मंच ह्यानावे तीनशेहून अधिक गावांमध्ये छोटे प्रयोग सुरू आहेत. आरमार दिन साजरा करणे- यामुळे स्वाभिमानाची भावना निर्माण होत आहे. तसेच मत्स्य जयंती, नारळीपौर्णिमा साजरा करण्यात येतो. मुंबईत गरीब वस्त्यांमध्ये शिक्षण, आरोग्य, रोजगार यासाठी प्रयोग सुरू आहेत. ६०० वस्त्यांपैकी १०० हून अधिक वस्त्यांमध्ये काम सुरू आहे. त्यात ६ सामाजिक संस्था देखील सोबत आहेत. भारताला स्वातंत्र्याच्या शताब्दीसाठी तयार करण्यासाठी संघ शताब्दी मध्ये काम करत आहे. आज येथे उपस्थित नागरिकांनी या समाजपरिवर्तनाच्या कामात स्वतःला जोडून घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.