श्रमजीवी संघटनेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य बि-हाड मोर्चा काढण्यात आला होता. श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडीत आणि रामभाऊ वारणा यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी, मुरबाड, कल्याण, अंबरनाथ, ठाणे या तालुक्यातील आदिवासींची तसंच इतर गोरगरिबांची घरे सरकारी आणि खाजगी जमिनीवर आहेत. आजही ही जागा त्यांच्या नावावर केलेली नाही. १९९५ आणि २०१५ पूर्वीची घरं नियमाकुल करावीत असे सरकारचे आदेश असूनही नावावर न करता सहा महिन्यांत ही सर्व बांधकामं पाडण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. भिवंडीमध्ये घरे पाडण्याची कारवाई सुरू झाल्यानं ही कारवाई थांबवावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.