मुंबईतील जिल्हाधिकारी आणि अंबानी यांच्या कार्यालयावर काढण्यात आलेल्या शेतकरी मोर्चाचे ठाण्यातील मुलुंड चेकनाका येथे स्वागत करण्यात आले. विविध संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या मोर्चेक-यांचे जोरदार स्वागत केले. सुमारे ७० गाड्यांतून आलेले शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. विश्वास उटगी, संजय मंगो यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते या स्वागतात सहभागी झाले होते. शेतकरी आंदोलनाला ठाणेकरांचा पाठिंबा, शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा, कामगार विरोधी कोड रद्द करा, अंबानींच्या जिओ सिमवर बहिष्कार घाला अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.